tag:blogger.com,1999:blog-48296029610640711392024-03-08T10:11:46.776-08:00माझं मतVIJAYhttp://www.blogger.com/profile/10340984480510709930noreply@blogger.comBlogger2125tag:blogger.com,1999:blog-4829602961064071139.post-58627257353865068402017-02-15T04:21:00.001-08:002017-02-15T04:25:10.433-08:00'आई आणि देव'<p dir="ltr"><b>आई</b>...आज काल हे दोन शब्द माझ्या बोलण्यातून मी येऊ देत नाही.कारण तसं साधं आहे,माझ्या आईला मी 'आई' अशीच हाक मारायचो.बोलण्याच्या ओघात जेव्हा मी आई बोलून जातो तेव्हा पटकन मला माझी आई आठवते,जणू काही मी माझ्या आईलाच किंवा तिच्याशीच काहीतरी बोलतोय असा वाटतं.कसं असतं ना...खरंच.एखादा जेव्हा पटकन बोलतो कि आई-बाबा  आणि तू आणि बायको एकत्र राहता ना???....ह्या प्रश्नाचा मला खूप त्रास होतो.नुसती वेळ मारून नेहण्यासाठी मी हो असं म्हणतो किंवा वडील असतात सोबत असं निघतं... मग आई? का पुन्हा हा प्रश्न लोक विचारतात? आपली सर्वात आवडती व्यक्ती आपली आई आज आपल्यासोबत नाहीये ह्यापेक्षा जगात आनखी कोणतीच गोष्ट वाईट असू शकत नाही.<br>
जेव्हा मित्रांसोबत ऑफिसमध्ये जेवत असतो तेव्हा एखादा बोलून जातो...आजची भाजी बायकोने बनवली वाटते..त्याला क रे असं कशावरून बोलतोस? असं विचारल्यावर पटकन तो बोलतो...आईला माहिते मला ही भाजी आवडत नाही.कमाल वाटते मला खरंच.तेव्हा कळतं आईला कोणीच रिप्लेस करू शकत नाही..देवाने कशी काय घडवली असेल आई ह्याचा विचार येतो कधी कधी मनात.त्याची सुद्धा असेलच ना कोणीतरी आई? मग असं कसं काय तो एखादया मुलाला त्याचा आईपासून दूर करू शकतो? ह्या यातना त्याने भोगल्या असतील का? तो राहिला असेल का आईपासून वेगळा... एखाद्या वेगळ्या जगात जिथे त्याची आई त्याचा सोबत नसेल आणि तिथे तो आपला नेहमीचा कारभार करतोय?<br>
देवाची पूजा मी का करायची हा प्रश्न मला का नाही पडणार मग....मान्य आहे मला कि त्याच्याशिवाय ह्या जगात काही चालत नाही..त्याला जे पाहिजे किंवा जशी त्याची ईच्छा तेच होणार,म्हणून काय मी त्याला पुजायचं? तो कधी बोलला नाही माझी पूजा करा आणि जर मी त्याची पूजा करून माझी आई तो मला पुन्हा देणार असेल तर मी नक्कीच पूजेन त्याला अगदी मनापासून....कारण तेव्हाच खऱ्या अर्थी तो माझ्यासाठी देव झाला असेल.<br>
आज मी मनात काहीच न ठेवता देवाच्या पाय पडतो कारण आज जे काही थोडं फार मी आयुष्यात केलंय ती त्याचीच कृपा आणि त्यासाठी मी त्याचे खरंच आभार मानतो तरीपण जेव्हा आई ची आठवण येते तेव्हा देवाने असं का केलं हाच प्रश्न मनात येतो.<br>
देवा जर माझं बोलणं तुझ्यापर्यंत पोहचत असेल तर मनापासून रिक्वेस्ट आहे...माझ्या आईला माझ्याजवळ पुन्हा पाठव...प्लिज पुन्हा पाठव.</p>
<p dir="ltr"><b>एक आईवेडा,</b><br>
<b>विजय साळुंखे</b></p>
VIJAYhttp://www.blogger.com/profile/10340984480510709930noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-4829602961064071139.post-56496212345271359962010-01-06T10:55:00.000-08:002010-01-06T11:05:07.603-08:00का गं आई...?<a onblur="try {parent.deselectBloggerImageGracefully();} catch(e) {}" href="http://3.bp.blogspot.com/_6nL-JZUudLA/S0TejCZ0HAI/AAAAAAAAATo/B5uM5ALPGgA/s1600-h/mothers-day-baby-and-mom-hand.jpg"><img style="display:block; margin:0px auto 10px; text-align:center;cursor:pointer; cursor:hand;width: 320px; height: 270px;" src="http://3.bp.blogspot.com/_6nL-JZUudLA/S0TejCZ0HAI/AAAAAAAAATo/B5uM5ALPGgA/s320/mothers-day-baby-and-mom-hand.jpg" border="0" alt="" id="BLOGGER_PHOTO_ID_5423704544782851074" /></a><br /><span class="Apple-style-span" style=" line-height: 28px; font-family:Arial, Helvetica, sans-serif;font-size:medium;"><div style="text-align: center;"><b><span class="Apple-style-span" style="font-size:large;">का गं आई...?</span></b></div><div><br /></div><div>आज माझी आई आम्हाला सोडून १ महिना झाला,खरेच तिचे वास्तव्य अजून आम्हाबरोबर आहे.पण स्वामी तिन्ही जागांचा आईविना भिकारी असं का बोलतात ते आज मला समजले .मला आईची भरपूर आठवण येते.माझ्या आईसाठी मी काही ओळी लिहिल्या आहेत,मी पहिल्यांदाच काही लिहित आहे ते आई फक्त तुझ्यासाठी.</div><div>आई खरंच आम्हाला अजूनसुद्धा असं वाटतंय कि तू इथेच कुठे तरी आहेस आणि तुला शोधायला बाहेर पडावे असं सारखे वाटतेय.</div><div>मित्रांनो आपल्या आई-वडिलांना भरपूर प्रेम द्या,तेच आपले खरे दैवत आहेत हे विसरू नका.</div><div><br /></div><b>का अशी वागलीस आम्हाबरोबर?,</b><div><b>का बरं अजून नाही थांबलीस?,</b></div><div><b>वेळ आणि काळाचे भान का ठेवलेस तू?,</b></div><div><b>भान आमचे कमी होते का गं आई ?</b></div><div><b><br /></b></div><div><b>दोन दिवसांपूर्वीच भेटलो होतो न तुला,</b></div><div><b>interview चे निम्मित्त झाले पुरे,</b></div><div><b>न सांगताच तुला भेटायला आलो होतो,</b></div><div><b>तुला जाताना सांगावासे नाही का गं वाटले आई?</b></div><div><b><br /></b></div><div><b>कसा जगू या जगात तुझ्याविना?,</b></div><div><b>आठवणी तुझ्या सारख्या येतात,</b></div><div><b>आणि टपकन डोळ्यात पाणी आणतात,</b></div><div><b>आम्हांस असं रडण्यासाठी का मागे ठेवलेस गं आई?</b></div><div><b><br /></b></div><div><b>सकाळी उठल्यावर तू मला दिसत का नाहीस?</b></div><div><b>उठत नाही लवकर म्हणून चादर खेचत का नाहीस?</b></div><div><b>घरातून निघताना आता 'आई येतो' असे आता म्हणवत का नाही?</b></div><div><b>मी तुला त्रास देत होतो म्हणून मला सोडून गेलीस का गं आई ?</b></div><div><b><br /></b></div><div><b>जेवताना आई तुझी भरपूर आठवण येते,</b></div><div><b>घरात वावरताना तुझाच भास होतो,</b></div><div><b>आज तू नाहीस पण पप्पा आहेस माझ्यासंगे,</b></div><div><b>सौभाग्यवती बनण्यासाठी तुला खरेच जायचे होते गं आई?</b></div><div><b><br /></b></div><div><b>तुझ्या असण्याची किंमत मला आता कळते,</b></div><div><b>तुला झालेला त्रास आज मला कळतो,</b></div><div><b>तू दिले जे प्रेम ते आज मला कळते,</b></div><div><b>याच प्रेमापायी परत येशील का गं माझी आई?</b></div><div><b><span class="Apple-style-span" style="font-weight: normal; "><div> </div><div> <b><span class="Apple-style-span" style="color:#FF0000;"> एक आईवेडा </span></b></div><div><b><span class="Apple-style-span" style="color:#FF0000;"> विजय साळुंखे </span></b></div></span></b></div><div><br /></div></span>VIJAYhttp://www.blogger.com/profile/10340984480510709930noreply@blogger.com2